आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पूरस्थिती निर्माण होते. या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.
राजाराम बंधारा येथे प्रत्यक्ष पाहणी:
राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज आपत्कालीन साहित्य आणि प्रात्याक्षिकाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून, त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी सविस्तर जाणून घेतल्या.
अत्याधुनिक रेस्क्यू साहित्याची प्रत्यक्ष तपासणी:
जिल्हाधिकारी श्री. राठोड यांनी खालील आपत्कालीन यंत्रसामग्री आणि बचाव साहित्याची बारकाईने पाहणी केली:
याप्रसंगी उपस्थित प्रमुख अधिकारी व मान्यवर:
या महत्त्वपूर्ण पाहणी प्रसंगी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व आपदा सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
