"कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी; विमानतळ सुरक्षिततेशी तडजोड नको"
- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर विमानतळ परिघामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सुरू असलेली विविध बांधकामे विमानतळाच्या सुरक्षिततेची मानके पूर्ण करण्यासाठी अडचणीची ठरू शकतात. ही बाब टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबाने ती पार पाडावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली.
विमानतळ परिघामध्ये करावयाचे बांधकाम नियमितीकरण व घनकचरा विल्हेवाट याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी सूचना दिली की, विमानतळ परिसरात असलेली अनाधिकृत बांधकामे संबंधित ग्रामपंचायतींनी त्वरित ओळखून (Identify) त्यावर कार्यवाही करावी.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर:
- • डॉ. जास्मिन (सीईओ, जिल्हा परिषद)
- • गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी)
- • श्रीमती मोसमी बर्डे-चौगुले (प्रांत अधिकारी)
- • स्वप्निल पवार (तहसीलदार)
- • अनिल शिंदे (विमानतळ संचालक)
- • दिलीप कदम (नागरी विकास प्राधिकरण)
- • संग्राम पाटील (जिल्हा परिषद सदस्य)
- • उदय गायकवाड
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोसमी बर्डे यांनी केले, तर विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सुरक्षिततेच्या नियमावलीबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी आणि क्रेडाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
