BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापुरात 'एक दिवसाआड' पाणी कपात रद्द करा; महाविकास आघाडीचे आयुक्तांना साकडे

कोल्हापूर पाणीपुरवठा विशेष बातमी
LATEST UPDATES

कोल्हापुरात 'एक दिवसाआड' पाणी कपात रद्द करा; महाविकास आघाडीचे आयुक्तांना साकडे

कोल्हापूर : प्रतिनिधी | दिनांक: ४ मे २०२६

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात लागू केलेला 'एक दिवसाआड' पाणीपुरवठ्याचा निर्णय अन्यायकारक असून, तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी पत्राद्वारे केली आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या शहरात एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. मात्र, मे महिन्यातील वाढते तापमान आणि तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत एक दिवस पाणी न येणे नागरिकांसाठी क्लेशदायक ठरत आहे. वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि नियोजनाच्या अभावामुळे शहरातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

यावर उपाय म्हणून विरोधी पक्षाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे. एक दिवसाआड पाणी देण्याऐवजी, पाणी वितरणाचा एकूण कालावधी थोडा कमी करावा, मात्र सर्व प्रभागांमध्ये दैनंदिन स्वरूपात विनाखंड आणि समान पाणी वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला रोज गरजेपुरते पाणी मिळेल आणि टंचाईची तीव्रता कमी होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

या मागणीसाठी राजेश लाटकर आणि इंद्रजित बोंद्रे यांच्यासह सचिन चव्हाण, सचिन शेंडे, अर्चना बिराजे, दिपाली घाटगे आणि रूपाली अजित पोवार या नगरसेवकांनी पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अन्यथा नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने