BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार

पी. एम. सूर्यघर योजना - कोल्हापूर न्यूज
कोल्हापूर | १५ मे २०२६ | (जिमाका)
शून्य वीज बिल मोहीम

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार

- मंत्री हसन मुश्रीफ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून साकारलेली पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवून पर्यावरण संरक्षण तसेच महागाईच्या कालखंडामध्ये ग्राहकांना शून्य वीज बिल आणून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

"या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी इच्छुक नागरिकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे."

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कागल तालुक्यातील पाणंद रस्ते, जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा आणि महावितरणच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. कागल तालुक्यातील ८६ गावांत किमान एक किलोमीटरपर्यंतचे पाणंद रस्ते तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जयसिंगराव तलावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी लवकरच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने