जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन; "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहीम रणशिंग!
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने दिनांक १ ते ५ जून २०२६ या कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी केले आहे.
यावर्षीची मुख्य संकल्पना व ध्येय:
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना हवामान कृती (Climate Action) अशी असून Mission LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवन शैलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
कचऱ्यापासून संपत्ती (Waste to Wealth), परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy), किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व जनजागृती
१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असून Bulk Waste Generators (BWGs) यांची ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी, घराघरातून कचरा संकलन यासंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येतील.
मोहिमेंतर्गत राबविले जाणारे प्रमुख उपक्रम:
५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभेमध्ये मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या असून, मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.