मलकापूर ते बाजार भोगाव ST बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन
मलकापूर ते बाजार भोगाव या मार्गावरील एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल केतन वेल्हाळ यांनी एसटी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून या मार्गावरील बससेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या बससेवेअभावी विद्यार्थी, महिला, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक व वेळेचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याने ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे स्नेहल वेल्हाळ यांनी सांगितले.
