प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात
आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आग्रही मागणी
कोल्हापूर | दि. २५ एप्रिल २०२६
प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. आय.टी.पार्क कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाजा दगड ठरणार असून, या आय.टी.पार्कच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या नगरीमध्ये स्थापिल्या जात असलेल्या आय.टी.पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
आय.टी. हबसाठी अत्याधुनिक सुविधांची मागणी:
शेंडा पार्क येथील ३४.३६ हेक्टर जागेत हे पार्क होत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून खालील State of the Art Infrastructure सुविधा मिळणे आवश्यक आहे:
कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने या भागातील युवकांना त्याचा उपयोग व्हावा. मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी गुंतवणूक करावी याकरिता 'मित्र' संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आ. क्षीरसागर यांनी दिले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी उद्योग विभागाचे आभार मानले.
शिवसेनेतील निष्ठावंतांना न्याय द्यावा
"कोल्हापुरात १९८६ पासूनचे शिवसैनिक निस्वार्थीपणे काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर कोल्हापूर शहराने सर्वप्रथम खंबीर पाठिंबा दिला. अनेक संकटे आणि मोर्चे झेलूनही शिवसैनिक डगमगले नाहीत. अशा निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विविध समित्या, महामंडळे आणि पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा," अशी आग्रही मागणी आ. राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली.
