BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

महाराणी ताराबाईंचा उल्लेख 'जैन महाराणी' केल्याने नवा वाद; आचार्य नयन पद्मसागर यांच्या विधानावर संताप

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मुघल सत्तेला समर्थपणे अंगावर घेणाऱ्या मराठा साम्राज्याच्या महाराणी ताराबाई यांच्याबद्दल जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ताराबाई यांचा उल्लेख त्यांनी 'जैन महाराणी' असा केल्याचे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, आचार्य नयन पद्मसागर यांनी म्हटले आहे की, "औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अमानुष हाल केले. त्यानंतर जैन महाराणी तारादेवींचा उदय झाला. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेला धूळ चारण्याचे महान कार्य जैन महाराणी ताराबाईंनी केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे."

ऐतिहासिक संदर्भ आणि विरोध:

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध सात वर्षे प्रखर लढा दिला. मात्र, त्यांचा संबंध कोणत्याही अर्थाने 'जैन' धर्माशी जोडण्यावर इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महापुरुषांचे जाती-धर्मात विभाजन करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

दरम्यान, या विधानाची सत्यता पडताळण्याचे आणि त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्याचे आवाहन दोन्ही बाजूंनी केले जात असून, या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

थोडे नवीन जरा जुने