BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग! धावत्या गाडीमुळे घाबरलेल्या चिमुरडीने मारली डॉ. अंजली निंबाळकरांना मिठी

मुंबई: कर्नाटक काँग्रेसच्या नेत्या आणि पुद्दुचेरीच्या प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पदयात्रेदरम्यान एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. माहिम परिसरात ही पदयात्रा सुरू असताना एका लहान मुलीचा जीव थोडक्यात बचावला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. निंबाळकर यांची पदयात्रा माहिममधून जात असताना एका चिमुरडीने त्यांना प्रेमाने गुलाबाचे फूल भेट दिले. फूल देऊन ती मुलगी बाजूला जात असतानाच मागून एक भरधाव गाडी आली. अचानक आलेल्या गाडीमुळे ती चिमुरडी प्रचंड घाबरली आणि तिने तात्काळ डॉ. अंजली निंबाळकर यांना घट्ट मिठी मारली. हा प्रसंग इतका अनपेक्षित होता की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

या घटनेनंतर डॉ. निंबाळकर यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे. "वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास असे जीवघेणे प्रसंग घडणार नाहीत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र या संवेदनशील क्षणाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.

थोडे नवीन जरा जुने