BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

५० वर्षांनंतर उमलले मैत्रीचे बंध; प्रायव्हेट हायस्कूलच्या १९७५-७६ बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा

 कोल्हापूर: 'शाळा सुटली, पाटी फुटली' असे म्हणत ५० वर्षांपूर्वी एकमेकांचा निरोप घेतलेले मित्र पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होते प्रायव्हेट हायस्कूलच्या १९७५-७६ सालच्या बॅचच्या सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळाव्याचे. तब्बल पाच दशकांनंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वांचे डोळे पाणावले होते.


कार्यक्रमाची सुरुवात कै. विभूते गुरुजी आणि कै. जोशी गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेची प्रार्थना म्हणताना सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत हरवून गेले. या प्रसंगी उपस्थित गुरुजन बी. जी. देशपांडे, जगदाळे सर, मीरा करकरे-सहस्त्रबुद्धे आणि शोभा नवनीहाळकर-कुलकर्णी यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

राजीव दिवाण यांनी वर्षभर परिश्रम घेऊन हुबळी, मुंबई, पुणे, ठाणे अशा विविध शहरांत विखुरलेल्या ६० मित्र-मैत्रिणींचा शोध घेतला. परिचयाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर चेहऱ्यांवरील सुरकुत्या मागे पडून बालपणीचे 'ते' सवंगडी एकमेकांसमोर उभे राहिले. शकील जमादार यांनी सादर केलेल्या गाण्यांनी आणि कव्वालीने कार्यक्रमात विशेष रंगत भरली.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन उदय सांगवडेकर यांनी केले, तर प्रास्ताविक राजीव दिवाण यांनी मांडले. दत्तात्रय आफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नसीर अत्तार, डॉ. विजय हिराणी आणि अतुल भाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सौ. सुनिता लठ्ठे, सौ. अलका देसाई, सौ. कांचन कसबेकर, तिलोत्तमत्ता लाड, सौ. रेखा माळकर, जगदीश लठ्ठे, रघुनाथ घाटगे, राजेंद्र कुलकर्णी, राहुल सुगंधी, धनाजी कोथमीरे, दिलीप देशिंगे, शांताराम कांबळे, जयेश ओसवाल, अजित खैरे यांसह ५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. 'पुन्हा लवकरच भेटू' या खात्रीसह जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

थोडे नवीन जरा जुने