BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापुरात २१ वा 'शिव महोत्सव' उत्साहात संपन्न; डॉ. संजय डी. पाटील यांना 'शिवगौरव' पुरस्कार प्रदान

शिव महोत्सव २०२६ - कोल्हापूर

कोल्हापुरात २१ वा 'शिव महोत्सव' उत्साहात संपन्न; डॉ. संजय डी. पाटील यांना 'शिवगौरव' पुरस्कार प्रदान

कोल्हापूर | मार्च २०२६

शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित २१ व्या वर्षाचा 'शिव महोत्सव २०२६' राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात सामाजिक प्रबोधन, पुरस्कार वितरण आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा अविष्कार पाहायला मिळाला. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते 'शिवगौरव' पुरस्काराने, तर नगरसेवक भरत लाटकर यांना 'शिवसेवा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अन्य २० मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील यांनी तरुणांना भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून समाजकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. नगरसेवक भरत लाटकर यांनीही राष्ट्रसेवेसाठी युवकांनी वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात 'सार्थक क्रिएशन्स' प्रस्तुत 'लोककलेचा जागर' आणि डी. आर. माने कॉलेज ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'देवीचा जागर' या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि अबोली गिऱ्हे यांच्या पहाडी आवाजातील गाण्यांमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

प्रमुख उपस्थिती:
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरसेवक आदिल फरास, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रा. रघुनाथ ढमकले, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, डॉ. सरदार जाधव, डॉ. प्रवीण कोडोलीकर, योगिता कोडोलीकर, विश्वजित वाडकर, नितेश गणेशाचार्य, अक्षय मोरे आणि डॉ. कपिल राजहंस.

कृती समितीचे अध्यक्ष मंजीत माने यांनी मनोगत व्यक्त केले, तर उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी स्वागत आणि सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले.

थोडे नवीन जरा जुने