कोल्हापूर - Team Newsskatta विशेष लेख
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय-सामाजिक पटावर अनेक चेहरे येत-जात असतात. काही नावे क्षणभर झळकतात आणि वेळेच्या ओघात हरवून जातात; तर काही नावे अशी असतात, जी लोकांच्या मनात खोलवर कोरली जातात. त्या नावांचा उच्चार झाला की लोकांच्या चेहऱ्यावर विश्वास, आदर आणि आपलेपणा उमटतो. आज जिल्ह्यात असंच एक नाव ठामपणे लोकांच्या मनात घर करून आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रकाश पाटील. त्यांच्या नावातील दादा हा शब्द फक्त संबोधन नाही, तर एका जबाबदार, प्रामाणिक आणि लोकांच्या अडचणींना आपल्या घरातल्या अडचणींसारखं समजणाऱ्या माणसाचा परिचय आहे.
प्रकाश पाटील यांनी समाजकारणात पाऊल ठेवतानाच आपल्याला एक गोष्ट मनाशी पक्की ठेवली काम करायचं तर लोकांसाठी, आवाज उठवायचा तर सामान्यांसाठी, आणि मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीचा उपयोग फक्त समाजहितासाठी. राजकारणात सत्ता, पद, प्रतिष्ठा यांच्यामागे धावणारी माणसं कमी नाहीत. पण प्रकाश दादांचा प्रवास वेगळा आहे. त्यांनी कधीच ग्लॅमरची किंवा मोठ्या पदांची आस धरली नाही; उलट लोकांच्या प्रश्नांसाठी भांडताना, गावागावातून फिरताना, तक्रारी ऐकताना, समस्या सोडवताना स्वतःची खरी ओळख निर्माण केली. या सगळ्या प्रवासात त्यांनी एकच गोष्ट जपली प्रामाणिकता. आणि हीच प्रामाणिकता आज त्यांना जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवून देते.
आज त्यांच्या या कामाचा, या संस्कारांचा, या निष्ठेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची लेक कुमारी धनश्री प्रकाश पाटील समाजकारणाच्या मैदानात उतरते आहे. धनश्रीचे नाव घेतलं की एक गोष्ट विशेष जाणवते ती बापाची लेक आहे, पण फक्त नावापुरती नाही. ती प्रकाश दादांच्या विचारांची, त्यांच्या संस्कारांची, त्यांच्या लोकाभिमुख कामाची खरी उतराई आहे. आज अनेक ठिकाणी राजकारणात मुलं-मुलींची एन्ट्री दिसते, पण त्यातील बहुतेक जण बापाच्या नावावर किंवा घराण्याच्या प्रतिष्ठेवर आधार घेत राजकारणात पाऊल टाकतात. पण धनश्री पाटील यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. त्या बापाच्या नावाचा वापर करून ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहत नाहीत; उलट स्वतःच्या कार्यातून, स्वतःच्या मेहनतीतून, आणि स्वतःच्या संवेदनशील दृष्टिकोनातून समाजासमोर उभं राहण्याची तयारी त्यांनी आधीच सुरू केली आहे.
धनश्री पाटील यांचा प्रवास अजून सुरूवातीला आहे. पण प्रत्येक सुरुवात मोठ्या कथेला आकार देते. बालविकास, महिलांच्या हक्कांसाठी जनजागृती, ग्रामीण भागातील मूलभूत अडचणी, गावागावातील मुलं-मुलींच्या शिक्षणाच्या समस्या या प्रत्येक विभागात धनश्री ताईंनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकारणात रुजण्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकांना त्यांचं दुःख समजून घेण्याची क्षमता असणं. धनश्री ताईंकडे ती क्षमता आहे. त्या प्रत्येक प्रश्नाकडे ‘समस्या’ म्हणून नव्हे तर ‘काहीतरी उपाय शोधता येईल’ या दृष्टिकोनातून पाहतात. समाजातील दुर्बल, कष्टकरी, आणि संघर्ष करणाऱ्या वर्गाच्या गरजा समजून त्या त्यांच्यासाठी उभ्या राहतात.
आज धनश्री प्रकाश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीत उतरतात आहे. हे फक्त एक राजकीय पाऊल नाही; हा एका नव्या विचाराचा आरंभ आहे. राजकारण म्हणजे फक्त सत्ता किंवा प्रतिष्ठा नाही, तर ते लोकांच्या जीवनात सुधारणा घडवण्याचं साधन आहे हा विचार त्यांनी प्रकाश दादांकडून शिकला आहे. प्रकाश दादांची शिकवण, “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे; तर समाजासाठी असतं,” हे वाक्य केवळ भाषणांचा भाग नाही. ते त्यांच्या घरातले मूल्य आहे. आणि धनश्री ताई त्या मूल्यांना मनापासून स्वीकारतात.
बाप-लेक यांचं नातं खूप सुंदर असतं, पण ते समाजकारणात उतरलं की ते अधिक प्रेरणादायी होतं. कारण इथे केवळ घरातील संस्कार नाहीत, तर जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा यांचं ओझंही पेलावं लागतं. धनश्री पाटील या ओझ्याला घाबरत नाहीत; उलट त्या याकडे एक संधी म्हणून पाहतात. संधी — स्वतःला सिद्ध करण्याची, लोकांमध्ये मिसळण्याची, प्रत्येक समस्येसाठी पर्याय शोधण्याची आणि आपल्या कार्यातून एक एक पाऊल टाकत स्वतःची ओळख निर्माण करण्याची.
आजकाल राजकारणात तरुणाईची गरज सर्वजण मान्य करतात. पण ती तरुणाई संवेदनशील, जागरूक, आणि लोकाभिमुख असणंही तितकंच आवश्यक आहे. धनश्री या त्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात जिथे नवीन विचार आहेत, प्रामाणिकता आहे, आणि समाजाप्रती खरी बांधिलकी आहे. प्रकाश दादांच्या अनुभवाचा आधार आणि स्वतःच्या स्वप्नांची ताकद या दोन गोष्टी मिळाल्यावर एक नवीन नेतृत्व तयार होतं आणि धनश्री ताई हे त्या नव्या नेतृत्वाचं ताजं उदाहरण आहेत.
आज बापाची लेक पुढे जाते आहे. गावापासून जिल्ह्यापर्यंत, अंगणापासून समाजापर्यंत, आणि कुटुंबाच्या संस्कारांपासून राजकारणातील जबाबदारीपर्यंत एक मोठा प्रवास तिच्यासमोर उभा आहे. पण तिच्या पावलात आत्मविश्वास आहे. चेहऱ्यावर साधेपणा आहे. आणि मनात समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची खरी इच्छा आहे. हे तीन गुण कोणत्याही मोठ्या पदापेक्षा महत्त्वाचे असतात. कारण पदं मिळतात किंवा जातात, पण मूल्यं आणि लोकांचा विश्वास कायम राहतो.
धनश्री ताईंच्या प्रवेशाने निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या मागे प्रकाश दादांसारचं मोठं नाव आहे, पण तेवढंच त्यांच्या चेहऱ्यावर स्वतःची ओळख, स्वतःची मेहनत, आणि स्वतःची तयारीही स्पष्ट दिसते. समाजकारणात पुढे येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असली तरी त्यापैकी काही जणी खरोखर कामातून ओळख निर्माण करतात. धनश्री ताई अशीच एक स्त्रीशक्तीची ओळख बनू शकतात, ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात, जिल्ह्यात, आणि सर्वसामान्यांमध्ये एक नवी जागरूकता निर्माण होऊ शकते.
समाजकारणात संवेदनशीलता महत्त्वाची असते. लोकांशी बोलताना, त्यांचे प्रश्न ऐकताना, त्यांना मदतीचा हात देताना, आणि त्यांच्या जीवनात थोडंसं का होईना बदल घडवताना नेत्याची किंमत ठरते. धनश्री ताईंच्या संवादात ही संवेदनशीलता जाणवते. त्या प्रत्येकाशी एकसमानतेने, सोप्या भाषेत बोलतात. त्यांच्यात कोणताही दिखावा नाही; आहे ती फक्त साधी, प्रामाणिक मनाची तरुणी जी समाजातील प्रत्येकासाठी उपलब्ध राहण्याची तयारी दाखवते.
निवडणूक जिंकणे हे लक्ष्य असू शकतं, पण समाजाच्या मनात स्थान निर्माण करणं हे नेत्याचं खरं यश असतं. प्रकाश दादांनी हे साधलं आहे. आणि आता धनश्री ताईही त्या दिशेने ठाम पावलं टाकत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे केवळ निवडणुकीतील वातावरण बदलेल असं नाही; तर तरुणाईला एक प्रेरणादायी उदाहरण मिळेल, की परिश्रम, प्रामाणिकता आणि संवेदनशीलता असेल तर नेतृत्व कोणालाही करता येतं.
आज बापाची लेक समाजकारणाच्या रणांगणात उभी आहे. तिच्या मागे आशिर्वाद, अनुभव, संस्कार आणि विश्वासाचा मोठा वारसा आहे. आणि तिच्या पुढे आशेची नवी दिशा आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे. आणि कामातून स्वतःचं नाव निर्माण करण्याची तळमळही आहे.
प्रकाश दादांनी जिथं काम थांबतं, तिथं धनश्री ताईंचा प्रवास सुरू होतो. त्यांच्या प्रवेशाने फक्त एक उमेदवार नाही, तर समाजासाठी समर्पित नव्या पिढीचं नेतृत्व पुढे येत आहे. हा क्षण कोल्हापूरसाठीही महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे. कारण बापाची लेक जेव्हा समाजासाठी पाऊल टाकते, तेव्हा ती फक्त घराचं नाव मोठं करत नाही तर ती समाजाच्या भविष्यातही नवा प्रकाश निर्माण करते.
आज धनश्री पाटील पुढे चालल्या आहेत आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आणि स्त्रीशक्तीच्या नव्या युगाची ओळख निर्माण करण्यासाठी. आणि या प्रवासात जनतेचा विश्वास, बापाची छाया आणि स्वतःची जिद्द या तिन्ही गोष्टी त्यांच्या सोबत आहेत.
कोल्हापूर या नव्या प्रवासाकडे उत्सुकतेने पाहत आहे कारण प्रत्येक बदलाची सुरुवात एका पावलानेच होते. आणि ते पाऊल धनश्री पाटीलने आज उचललं आहे.

