BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राष्ट्रीय रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठ टॉप 50 मध्ये....

Team Newsskatta कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने यंदा उल्लेखनीय झेप घेतली आहे. देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपली उपस्थिती सातत्याने कायम ठेवणाऱ्या या विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या विशेष यादीत थेट पहिल्या ५० विद्यापीठांत स्थान मिळवले आहे.


२०१६ पासून एनआयआरएफच्या यादीत नियमित स्थान मिळवणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक संस्थांची वाढती संख्या, बदलते निकष आणि स्पर्धा यांचा सामना करत आपली कामगिरी टिकवून ठेवली आहे. यंदा विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर १५१-२०० या रँकबँडमध्ये आहे, तर राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ५१.८० गुणांसह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे.


ही झेप केवळ क्रमांकात झालेली सुधारणा नाही, तर गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. एनआयआरएफच्या गुणवत्ताधारित निकषांनुसार शिक्षण, संशोधन आणि समाजाभिमुख कार्याची उंचावलेली पातळी हीच या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.


यापूर्वी ५१-१०० या गटात असलेले शिवाजी विद्यापीठ यंदा टॉप-५० मध्ये झेप घेतल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आणखी तीन विद्यापीठांनी यादीत ठसा उमटवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११ व्या, मुंबई विद्यापीठ १२ व्या तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ ४३ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.


“शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनातील सातत्य हेच विद्यापीठाच्या प्रगतीचे मूळ कारण आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.


राष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान केवळ विद्यापीठापुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानास्पद ठरतो. ज्ञान, गुणवत्ता आणि संशोधनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे हे यश शैक्षणिक विश्वात कोल्हापूरचा ठसा अधिक गडद करणारे आहे.


थोडे नवीन जरा जुने