BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

गोकुळच्या हंडीतलं लोणी कोण खातंय?

 कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील दूध उत्पादक संस्थांना ३ कोटी ७४ लाख रुपयांचे जाजम आणि घड्याळ भेटवस्तू देण्यात आल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे थरकाप उडवणारे आरोप झाले आहेत. निविदा न काढता कोटेशन पद्धतीने कोट्यवधींची खरेदी करून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप करत संघातील कारभार पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेल्याचा दावा करण्यात आला आहे.


उद्धव गटाच्या नेत्यांनी थेट इशारा देत म्हटलं आहे की, "भेटवस्तू देण्याला आमचा विरोध नाही, पण खरेदीची पद्धतच संशयास्पद आहे. गोकुळ शेतकऱ्यांचा असूनही तो राजकीय अड्डा बनला आहे. कधी मेडिटेशनच्या नावाखाली फाईव्ह स्टार हॉटेलमधील सहल, कधी पशुखाद्य घोटाळा, कधी वासाचे दूध  आता तर जाजम-घड्याळ प्रकरण. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचा सरळसरळ अपहार आहे."

नेत्यांनी गोसावी यांच्या चौकशीवर भर देत ठाम मागणी केली की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि कोट्यवधींची रक्कम वसूल करण्यात यावी.

“गोकुळच्या हंडीतलं लोणी खाणाऱ्यांना आता शिक्षा मिळालीच पाहिजे. चुकीचा निर्णय झाला, तर चौकशी करणारांनाही शेतकरी जाब विचारतील..

थोडे नवीन जरा जुने