BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर अमानुष हल्ला; लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर परिसरात तीन पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रकार समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. झी २४ तासचे ब्युरोप्रमुख योगेश खरे, साम टीव्हीचे पत्रकार अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे यांना स्थानिक गावगुंडांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर दोन पत्रकार जखमी असून सध्या प्राथमिक उपचार घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार वार्तांकनासाठी आले असताना काही स्थानिकांनी त्यांना अडवून मारहाण केली. पत्रकारांनी घटनास्थळावर वास्तव परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला असता, गावगुंडांनी हात उचलला. ही घटना फक्त व्यक्तिगत हल्ला नसून लोकशाहीतील चौथा स्तंभ असुरक्षित असल्याचे गंभीर संकेत देते.


या घटनेवर पत्रकार संघटनांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. “जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे” असे पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले. त्यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.


पोलीस प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून आरोपी गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल केला असून, योग्य तपास सुरू असल्याची माहिती मिळते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या प्रकारच्या घटनांमध्ये त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे आणि दोषींना कायद्याने शिक्षा होईल.”

थोडे नवीन जरा जुने