BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

फर्ग्युसोनियन्स’शी पत्रकारितेवर संवाद

पुणे : “राजकारण्यांशी पत्रकारांची मैत्री असावी की केवळ सुसंवाद? वृत्तपत्रे विशिष्ट विचारसरणीशी जोडलेली असतात का? अग्रलेखांत अवघड शब्दांचा भरणा का असतो? बातमी लिहिताना भाषेवर प्रभुत्व किती महत्त्वाचे आहे? पेड न्यूज असतात का? जाहिरात व पेड न्यूज यात नेमका फरक काय?”

असे असंख्य प्रश्न फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांकडून पत्रकारांसमोर मांडले गेले.


पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवणे हा एक वेगळाच आनंद असतो; पण मराठी भाषा शिकणारे आणि मराठीवर मनापासून प्रेम करणारे विद्यार्थी जेव्हा पत्रकारितेबद्दल उत्सुकता व्यक्त करतात, तेव्हा संवाद अधिकच रोचक ठरतो. पत्रकारितेच्या क्षेत्राविषयी समाजात असलेले कुतूहल या मुला-मुलींच्या प्रश्नांतूनही प्रकर्षाने जाणवत होते.

संपूर्ण तासभर चाललेल्या या चर्चेत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देताना भाषेचा दर्जा, भाषेची अचूकता आणि पत्रकारितेतील जबाबदारी यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांतला घसरत चाललेला भाषेचा स्तर नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनाही जाणवू लागल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.

या चर्चेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, समन्वयक डॉ. वृषाली बर्गे, तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रूपाली शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्रात जगदीश बामणे, निखिल सुक्रे, वैष्णवी सुळके यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

नव्या पिढीशी संवाद साधणं ही नेहमीच उभारी देणारी गोष्ट असल्याचं मत व्यक्त करून हा संवाद संस्मरणीय ठरला.

✍️ उत्तमकुमार

थोडे नवीन जरा जुने