BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

टीव्ही पत्रकारिता समाजाचा आरसा – रणजीत माजगावकर

कोल्हापूर : प्रतिनिधी

टीव्ही पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, ती समाजाचा आरसा आहे. समाजातील घटना, समस्या आणि बदल यांचे प्रतिबिंब टेलिव्हिजन पत्रकारितेतून स्पष्टपणे दिसते, असे प्रतिपादन साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांनी केले.



शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात ‘टेलिव्हिजन न्यूज प्रोडक्शन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत माजगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


ते म्हणाले, टेलिव्हिजन क्षेत्रात सन 2000 नंतर मोठे बदल झाले. दूरदर्शन हा टेलिव्हिजनच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातून टीव्ही पत्रकारितेची संकल्पना पुढे आली आणि सोशल मीडियामुळे ती आणखी बळकट झाली. समाजाची टेस्ट बदलली आहे, त्यामुळे पत्रकारांनी सतत नवे प्रयोग केले पाहिजेत. लोकांचे प्रश्न मांडणे हे पत्रकाराचे पहिले कर्तव्य आहे. आपल्या आवडीचे करिअर घडवण्यासाठी स्वतःचे बीट तयार करा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

रणजीत माजगावकर यांचे स्वागत करताना विभाग प्रमुख प्रा.डॉ. निशा पवार, डावीकडून डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अनुराधा इनामदार


कार्यशाळेदरम्यान त्यांनी कॅमेरा व माईक हॅण्डलिंग, तांत्रिक बाबी, तसेच पत्रकारांसमोरच्या अडचणी आणि त्यांचा सामना करण्याच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.


या प्रसंगी पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अनुराधा इनामदार, शैलेश कोरे, विवेक पोर्लेकर उपस्थित होते. कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मिस्त्री यांनी केले तर आभार रणजीत फगरे यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने