BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

तमिळनाडूत विजय थलपथीच्या सभेत भीषण अपघात; मृतांचा आकडा 39 वर

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा विजय थलपथी याने अभिनयाला पूर्णविराम देत 2024 मध्ये थेट राजकारणात उडी घेतली. त्याने स्थापन केलेल्या तमिळगा वित्र कझगम् (टीव्हीके) या पक्षाची घोषणा होताच तामिळनाडूत प्रचंड चर्चा रंगली होती. सत्ताधारी द्रमुकविरोधी पक्ष म्हणून टीव्हीकेला मोठा पर्याय मानले जात असल्याने राज्यातील जनतेत विजयच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक सभेला गर्दी उसळत असून त्याचा जनाधार किती मोठा आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.


शनिवारी तामिळनाडूतील करुर येथे विजयच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. विजयला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. मात्र अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. सभास्थळी प्रचंड गोंधळ उडाला आणि मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 निरागस चिमुकल्यांचाही समावेश आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या अपघातानंतर संपूर्ण तामिळनाडूतच नव्हे तर देशभरातून संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. अभिनेता ते नेता झालेल्या विजयवर आणि त्यांच्या पक्षावर निषेधाची झोड उठली आहे. मोठ्या सभांमध्ये गर्दी नियंत्रणात ठेवण्यात पक्ष अपयशी ठरल्याची टीका सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होत आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींच्या उपचारांसाठी मदतीची हमी दिली आहे. राष्ट्रपतींनीही या घटनेवर खोल शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून सुरक्षेतील त्रुटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


ही घटना विजयच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण राजकारणात पाऊल ठेवताच एवढ्या मोठ्या दुर्घटनेची छाया त्यांच्या प्रतिमेवर उमटली आहे. विजय आणि टीव्हीकेसाठी पुढची पावले आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने