BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

सीमेवरील दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना न्याय मिळावा

कोल्हापूर | राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने कोल्हापूर सर्किट बेंचची निर्मिती झाली असून ती व्यवस्था केवळ वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरिबांसाठी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनानंतर मेरी वेदर क्रीडांगणावर आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.


गवई म्हणाले की, "समानतेच्या न्यायदानासाठी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा. आता खंडपीठ स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा. ती मागणी लवकरच पूर्ण होईल."

ते पुढे म्हणाले, "गेल्या ४३ वर्षांच्या संघर्षात २५ वर्षांपासून मी सहभागी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ पासून या लढ्यात आहेत. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचा आग्रह मी कायम धरला. आज हा निर्णय प्रत्यक्षात आल्याचा मला आनंद आहे."

शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना न्याय देण्याची संधी मिळाल्याचे सांगून त्यांनी या दिवसाला नियुक्तीप्रमाणेच आनंददायी म्हटले. कोल्हापूर सर्किट बेंच ही वंचितांसाठी न्यायप्राप्तीचा मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


थोडे नवीन जरा जुने