BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या उफाळल्या, ४५ बंधारे पाण्याखाली - पंचगंगा नदी पुन्हा धोक्याच्या उंबरठ्यावर

कोल्हापुर - घाटमाथा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचा रौद्ररूप पुन्हा एकदा दिसू लागला आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात तब्बल पाचव्यांदा पात्राबाहेर गेली असून इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला

पावसाचा जोर कायम राहिल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे सोमवारी पहाटे उघडण्यात आले. परिणामी तब्बल ११ हजार ५०० क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे. या प्रचंड विसर्गामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन नदीने पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे.

इतर धरणांतूनही पाण्याचा मोकाट प्रवाह

जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. वारणा धरणातून ६,६३० क्युसेक, दूधगंगा धरणातून ५,५०० क्युसेक तर कुंभी धरणातून १,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व विसर्गामुळे पंचगंगा आणि उपनद्यांची पातळी सतत वाढत असून नदीकाठच्या गावांना सजग राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

४५ बंधारे पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

शाहुवाडीसह जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शाहुवाडी तालुक्यातील कासारी खोऱ्यातील बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून बर्की, बुरानवाडी, लटकेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हाभरात तब्बल ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाचा अलर्ट

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या ग्रामस्थांना धोकादायक ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनावरे आणि मालमत्ता यांची देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे,” असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने