BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीवर खंजीर खुपसला- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताच राज्य सरकारने कोल्हापूरपुरती अधिसूचना मागे घेतली होती. मात्र, नव्या आराखड्यानुसार आता हा महामार्ग पुन्हा कोल्हापूरमधून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर केला आहे.


अध्यक्षीय शासकीय आदेशात कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाचा समावेश पुन्हा नमूद करण्यात आला आहे. मार्चमध्ये काढलेली अधिसूचना ऑक्टोबरमध्ये रद्द करण्यात आली होती, परंतु अध्यक्षीय आदेशाच्या माध्यमातून आता महामार्ग होणार हे स्पष्ट झाले आहे.

सतेज पाटील म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीवर खंजीर खुपसला आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या महामार्गाची गरज नाही. त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतमालाला हमीभाव, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, तरुणांना रोजगार आणि मुंबईतील लोकल ट्रेनमधील अपघात थांबवणे हे आहेत. जर खर्च करायचाच असेल तर नागपूर–रत्नागिरी महामार्ग, मुंबई लोकलसाठी उपाययोजना किंवा सरकारी नोकरभरती यावर पैसे खर्च करा, परंतु शक्तीपीठ महामार्गाची सक्ती करू नका."

कोल्हापूरकरांची दिशाभूल करून सरकारने पुन्हा अधिसूचना बदलली असल्याचा ठपका ठेवत त्यांनी पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.

थोडे नवीन जरा जुने