BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास १४३.९० कोटींची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास अखेर १४३.९० कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उच्चाधिकार समितीचे आभार मानले आहेत.


एकूण १४४५.९७ कोटींचा प्रस्ताव जुलै महिन्यात उच्चाधिकार समितीसमोर मांडण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. उर्वरित कामांसाठी भूसंपादन समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील टप्प्यात मान्यता मिळणार आहे.


२०१५ च्या शासन निर्णयानुसार तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या माध्यमातून तयार झालेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीपरिषदेच्या बैठकीत या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता मिळाली होती.


सद्यस्थितीत मंजूर झालेल्या १४३.९० कोटींच्या कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांना ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले असून, ३१ मार्च २०२८ पर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे.


आराखड्यातील कामांसाठी आवश्यक तांत्रिक मान्यता, पर्यावरण, पुरातत्व, वनविभाग इत्यादी परवानग्या मिळविण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवरच राहणार आहे. तसेच या कामांमध्ये द्विरुक्ती होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.


जिल्हास्तरीय तांत्रिक समिती व कार्यकारी समितीमार्फत आराखड्याचे नियोजन, संनियंत्रण आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. भाविक व पर्यटकांसाठी नव्याने उभारल्या जाणाऱ्या सुविधा सर्वांसाठी खुले राहतील, अशी अट करारनाम्यात समाविष्ट केली जाणार आहे. ही योजना २०२५-२६ पासून प्रत्यक्षात सुरू होणार असून, खर्चाची तरतूद पर्यटन पायाभूत सुविधा या लेखाशिर्षातून केली जाणार आहे.




थोडे नवीन जरा जुने