BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

अतिवृष्टीचा इशारा जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क...

कोल्हापूर : राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.



जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कागल-राधानगरी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर जिल्ह्यात सतत पाऊस होत असून राधानगरी व काळम्मावाडी धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना वेळेत सतर्क करणे आवश्यक आहे. नदीकाठच्या गावांना आवश्यक सूचना योग्य वेळी पोहोचल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.


बैठकीत दररोज पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणातून होणारा विसर्ग, नद्यांची पाणी पातळी, तसेच अलमट्टी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी अतिवृष्टीसंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.





थोडे नवीन जरा जुने