BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

एकटेपण म्हणजे जीवन नसते !!

कोमल वखरे विशेष लेख 

एकटेपणा म्हणजे सुकून असं वाटायचं पण दिवसेंदिवस हाच एकटेपणा किती घातक आहे हे समजत आहे आयुष्य जगत असताना मित्र , कुटुंब , शेजारी , नातेवाईक यांचं महत्त्व खूप आहे मात्र ते कळून येत नाही नात्यांचा हाच सहवास आयुष्य अधिक रंगीन करून टाकते विचारांची देवाण-घेवाण इतरांची मते प्रत्येकाची विचारसरणी ही संवादातून कळते हा संवाद नाते निर्माण करतो मात्र एकटेपणाचा निर्णय हा थोड्या काळासाठी स्वतःच्या एकांतासाठी हवा काही काळासाठी मनशांतीसाठी हा निर्णय हितकारक ठरतो मात्र आयुष्य जास्त काळ एकटेपणा मध्ये जगणं अशक्य आहे एकटेपणामध्येच नैराश्य अति विचार अशा अनेक मानसिक आजारांना सामोरे जाव लागत आणि एवढेच नाही तर या मानसिक आजारांमुळे शारीरिक परिणामही दिसतात मन आणि शरीर या नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणूनच संवाद हा दोन्हीवर योग्यरीत्या प्रभाव पाडतो माझ्या वैयक्तिक अनुभवावरूनही सुरुवातीस मला एकटेपणा एकांत खूप प्रिय वाटायचा मात्र एकांतामध्ये जेव्हा मी स्वतःला वेळ दिला तेव्हा थोड्या वेळासाठी मला बरं वाटलं मात्र जास्त काळानंतर हाच एकांत हाच एकटेपणा मला सर्वात मोठी समस्या वाटू लागली माझ्या आयुष्यामध्ये मी कोणासोबत तरी संवाद साधावा असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले त्यामुळे मित्र-मैत्रिणींचा सहवासच अनेक टेन्शन मधून मुक्त करतो 

जिवलग नसतील तर हास्यही विरतं

एकटेपण आलं की जीवन हरवतं



थोडे नवीन जरा जुने