BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

८ दिवसातून एकदाच पाणी; अविष्कार कॉलनीत संताप

कोमल वखरे/ छत्रपती संभाजीनगर – शहरातील सिडको एन-६ भागातील अविष्कार कॉलनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आठ दिवसातून केवळ एकदाच नळाला पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत असून, त्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.


रहिवाशांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या असूनदेखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जेव्हा पाणी येतं, तेही केवळ एका तासासाठीच. त्यामुळे अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा करणेही अवघड होऊन बसले आहे. नागरिकांना खासगी टँकर मागवावा लागतो आणि त्यामुळे दरमहा अतिरिक्त आर्थिक भार वाढत आहे.

"आमचं काही ऐकून घेतलं जात नाही. निदान दर चार दिवसांनी तरी पाणी मिळावं, हीच आमची मागणी आहे," असं अविष्कार कॉलनीतील एका रहिवाशाने सांगितलं. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

थोडे नवीन जरा जुने