BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

भाजपा कोल्हापूर आनंदोत्सव - बातमी

पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय!

कोल्हापूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

कोल्हापूर | दिनांक ४ मे २०२६

पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दुचेरी या ठिकाणी भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'देश का नेता कैसा हो... नरेंद्र मोदी जैसा हो', 'भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

"विकसित भारताच्या दिशेने भाजपाचे भरीव योगदान" - खासदार धनंजय महाडिक

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, हा विजय केवळ पक्ष म्हणून नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख धोरणांचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या दडपशाहीला सुरुंग लावला आहे. अमितजी शहा यांनी पश्चिम बंगालच्या दहशतमुक्तीसाठी उचललेल्या खंबीर पावलांमुळेच आज तिथे सत्तांतर होऊन भाजपला संपूर्ण जनाधार मिळाला आहे.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात विजयाचे श्रेय निष्ठावान कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणाले की, जनतेला आता केवळ विकास आणि सुशासन हवे आहे आणि भाजप ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे. याप्रसंगी माजी प्रदेश सचिव महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
धनंजय महाडिक, विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, शिवाजी बुवा, अमर साठे, हेमंत आराध्ये, भरत काळे, संतोष लाड, विजय अगारवाल, गणेश देसाई, शौलेश पाटील, गिरीश साळोखे, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, दीपक काटकर, संतोष भिवटे, सयाजी आळवेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, नगरसेवक रेखा उगवे, माधुरी व्हटकर, माधुरी नकाते, अर्चना कोराणे, विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, विश्वजित पवार, महेश यादव, धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, सुनील पाटील, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, संभाजी शिंदे, राकेश गुंदेशा, सचिन पोवार, प्रसाद जाधव, संग्राम जरग, अवधूत भाट्ये, शेखर जाधव, सुधीर बोळावे, अमेय भालकर, ओंकार गोसावी, दिलीप बोंद्रे, भूषण कानकेकर, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, रोहित कारंडे, प्रसाद पाटोळे, विवेक कोरडे, प्रशांत बारड, अनिकेत अतिग्रे, उमा पोवार, रेणू खुपेकर, सुषमा माजगांवकर, विशाखा कलशेट्टी, विजय कामत, विनायक कदम, निवास देसाई, अमर जत्राटे, सुमित पारखे, अभिषेक भोसले, किरण कुलकर्णी, प्रवीणचंद्र शिंदे, समर्थ चिले, सुहास सदलगे, सागर रांगोळे, नितीन पोवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने