कोल्हापूर | १५ मे २०२६
"सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आणा; नागरिकांच्या पाणी प्रश्नाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही"
- आमदार राजेश क्षीरसागर
योजनेची किंमत: ३४३ कोटी रुपये
करवीर तालुक्यातील सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या भव्य योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे.
आमदारांचा सज्जड दम:
"पाणी प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचारी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. काम टाळणाऱ्या ठेकेदारांना थेट ब्लॅकलिस्ट करा!"
"पाणी प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचारी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. काम टाळणाऱ्या ठेकेदारांना थेट ब्लॅकलिस्ट करा!"
बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी माहिती दिली की, योजनेचे ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित कामासाठी आमदार क्षीरसागर यांनी कडक मुदत आखून दिली आहे. विशेषतः रस्ते खुदाईमुळे होणारा त्रास लक्षात घेता, खोदलेले रस्ते पुढील एका महिन्याच्या आत दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
- • डॉ. विजय राठोड (जिल्हाधिकारी)
- • डॉ. जास्मिन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.)
- • डी. के. पाटील (कार्यकारी अभियंता, MJP)
- • पी. एच. गायकवाड (उपअभियंता)
