BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

जनगणनेतील माहितीची गुणवत्ता व सत्यता महत्त्वाची : डॉ. निरुपमा डांगे

कोल्हापूर : प्रतिनिधी

"पुढील दोन दशकांसाठी देशाच्या ध्येयधोरणांचा आधार जनगणना असते. त्यामुळे या प्रक्रियेत माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणे अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आगामी जनगणनेच्या पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या.



यावेळी डॉ. डांगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर 'जिल्हा जनगणना कार्यालयाचे' उद्घाटन करण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपसंचालक प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

प्रशिक्षण: प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष कार्यशाळा घेऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करावे.

दक्षता: माहिती घेताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.

पूर्व-चाचणी: जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील ४५ गावांमध्ये 'प्री-टेस्ट' यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

प्राधान्य: जनगणना हे राष्ट्रीय काम असल्याने याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाबाबत डॉ. डांगे यांनी समाधान व्यक्त करत अचूक व पारदर्शक काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने