BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर

 मुंबई दि.०६ : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला आणि युवकांसह समाजातील सर्व घटनांना सामावून घेणारा विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि सामाजिक योजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्याचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा रोडमॅप असून यामुळे राज्याच्या प्रगतीला निश्चितच गती मिळेल आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे. एकंदरीत पाहता राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला महाराष्ट्र राज्याकडून शाश्वत विकासाची हमी देणारा असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. 


     


थोडे नवीन जरा जुने