BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन जर्नालिझम माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; लवकरच 'माजी विद्यार्थी संघटना' स्थापन होणार

 कोल्हापूर : प्रतिनिधी

"पत्रकारितेचे क्षेत्र सध्या अत्यंत झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या डिजिटल युगात आणि स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. कल्पकता आणि उपक्रमशीलता जपली तरच आपण लोकोपयोगी पत्रकारिता करू शकू," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी केले.


शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित 'पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम' कोर्सच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या मेळाव्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अध्यासनाच्या माजी विद्यार्थ्यांची एक अधिकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविकात या संघटनेची गरज अधोरेखित केली. येणाऱ्या काळात विभागाला माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाची जोड मिळावी आणि त्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही संघटना कार्य करेल. येत्या काही दिवसांतच या संघटनेची रीतसर कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळच्या सत्रात वैचारिक चर्चा आणि मार्गदर्शन झाल्यानंतर, दुपारच्या सत्रात मास कम्युनिकेशन आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी कविता वाचन, अभिनय आणि बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. विशेषतः फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषेने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी वाघमोडे हिने केले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर, जयप्रकाश पाटील यांच्यासह अध्यासनाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर जुन्या सहकाऱ्यांची भेट झाल्याने अध्यासनाच्या परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण होते

थोडे नवीन जरा जुने