BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

निष्ठेचे फळ आणि राजकीय समीकरणे; ८ स्वीकृत नगरसेवक

  कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा पेच अखेर सुटला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या आठ स्वीकृत नगरसेवक पदांसाठी तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या



 उमेदवारांची नावे निश्चित..

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे पक्षांनी आपली अधिकृत पत्रे सुपूर्द केली असून, २० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पक्षनिहाय बलाबल आणि निवडलेली नावे या आठ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ३, काँग्रेसला ३ आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत राजकीय गणिते आणि पक्षांतर्गत निष्ठेचा विचार करून ही नावे ठरवण्यात आली आहेत.

• भारतीय जनता पक्ष: भाजपने प्राध्यापक जयंत पाटील, विजय जाधव आणि सुनील वाडकर यांची निवड केली आहे 

• काँग्रेस: काँग्रेसच्या वतीने मुस्ताक मलबारी आणि राहुल माने यांची वर्णी लागली आहे सुनील मोदी यांची निवड करण्यात आली आहे

• शिवसेना (शिंदे गट): रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांची नावे निश्चित झाली आहेत 


निवडीमागील महत्त्वाची कारणे आणि पार्श्वभूमी या निवडीमध्ये अनेक दिग्गजांनी बाजी मारली असून, काही अनपेक्षित बदलही पाहायला मिळाले. प्राध्यापक जयंत पाटील हे भाजपच्या वतीने पाचव्यांदा स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश करत आहेत, जे त्यांच्या अनुभवाचे आणि पक्षातील स्थानाचे प्रतीक आहे 

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना त्यांच्या ३० वर्षांच्या पक्षनिष्ठेचे फळ म्हणून पहिल्यांदाच ही संधी देण्यात आली आहे.तसेच, सुनील वाडकर जे १५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या नावासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आग्रह धरला होता, ज्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला.

काँग्रेसकडून मुस्ताक मलबारी यांनी महापालिका निवडणुकीत पक्षासाठी केलेले मोठे काम आणि निवडून आणलेल्या जागांचा विचार करून त्यांना संधी दिली आहे तर, राहुल माने यांनी शारंगर देशमुख यांच्या विरोधात दिलेली झुंजार लढत पाहता, त्यांच्या पराभवानंतरही पक्षाने त्यांच्या कष्टाची दखल घेतली आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी नुकताच राजीनामा दिला होता, परंतु आमदार सतेज पाटील यांच्या रणनीतीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याने त्यांची निवड झाली आहे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसाद चव्हाण यांना दिलेला शब्द पाळला, तर शिरोळकर यांना त्यांच्या समन्वयक म्हणून केलेल्या चांगल्या कामाचे बक्षीस मिळाले आहे

थोडे नवीन जरा जुने