BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

मेन राजाराम कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दलची ओळख वाढावी, भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “हिंदी है मेरे देश की बिंदी”, “हिंदी विषय का महत्व” आणि “मुंशी प्रेमचंद” या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, सर्जनशील आणि माहितीपूर्ण निबंध लिहून हिंदी भाषेवरील आपली आस्था व्यक्त केली.


स्पर्धेचा निकाल

इयत्ता ११ वी :

प्रथम – संचिता माळवी

द्वितीय – मेहजबीन मुल्लाणी

तृतीय – प्रियांका कुरणे, रिधिमा पाल

उत्तेजनार्थ – सिद्धी माने

इयत्ता १२ वी :

प्रथम – ऋषाली कांबळे

द्वितीय – कल्याणी हिरेमठ

तृतीय – पद्मिनी उमेश गवळी

उत्तेजनार्थ – अनुष्का खोत

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुषमा पाटील, तसेच ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. अनिल लाड, प्रा. बाबासाहेब माळवे, प्रा. बाबुराव यादव, प्रा. भाऊसाहेब धराडे, प्रा. राहुल देशमुख आणि प्रा. प्रमिला मळगे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. खाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना हिंदी भाषा ही देशातील संवाद, एकात्मता आणि साहित्य यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते नव्हे तर दैनंदिन जीवनातही हिंदी भाषेचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून, हिंदी दिवस हा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव मिळवून देणारा ठरला.

थोडे नवीन जरा जुने