कधीकाळी "Periods" हा शब्द कुजबुजून बोलला जायचा. दुकानातून सॅनिटरी नॅपकिन घेताना कागदात गुंडाळून दिलं जायचं. शाळेत शिकवताना मुलींना वेगळं वर्गात नेलं जायचं, जणू काही ही लाजेची गोष्ट होती.पण आता काळ बदलतोय... आणि आपली मानसिकताही!
आज मुली उघडपणे बोलू लागल्या आहेत – हो, आम्हाला periods येतात!कारण ही लाज नव्हे – ही शरीरशास्त्रीय प्रकृती आहे.ती दुखते, त्रास देते, थकवते – पण तरीही ती रोजच्या जबाबदाऱ्या निभावत राहते.
आजच्या युगात पिरियड्सबाबत बोलणं हे taboo राहिलेलं नाही.शाळांमध्ये आता boys आणि girls दोघांना एकत्र शिकवलं जातं.काही ऑफिसेस मध्ये 'period leave' सुद्धा मिळतोय – ही मोठीच पावती आहे समजुतीची.
संजय गांधी सारख्या अनेक संस्थांनी पॅड वेंडिंग मशीन लावल्या, ग्रामीण भागात मोफत नॅपकिन्स मिळतात – याचं श्रेयही समाजातील मानसिकता बदलण्यालाच.मुलींनी आता हे दिवस लपवायचे बंद केलेत.आता ती स्वतःच्या शरीराशी, वेदनेशी, भावनांशी प्रामाणिक आहे.
Periods म्हणजे अशुद्धता नाही, ही सृष्टीची निर्मिती करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.म्हणूनच " ती लाजतेय नाही आता, ती बोलतेय... कारण बोलणंच आहे आता तिचा सन्मान!
विशेष लेख स्नेहल तोडकर
