BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पंचगंगा स्वच्छतेला नवा आयाम – ३९५ कोटींच्या कामांना ग्रीन सिग्नल

 पुष्पा पाटील / इचलकरंजी – औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होत आहे. तब्बल ६०९.५८ कोटी रुपयांच्या मंजूर निधीमधून जीएसटी, भाववाढ आणि पीएमसी खर्च वगळता ३९५ कोटी रुपयांच्या कामांसाठी इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. या नामांकित कंपनीला आदेश देण्यात आले असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.


कार्यारंभ आदेश देण्याच्या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ईरप्पा नाईक, उपअभियंता अमित भुरले, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव व सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर आभिषेक सिंग उपस्थित होते.


या प्रकल्पाच्या मागील वाटचालीत, जुलै २०२२ मध्ये खासदार माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगेत जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत याला तत्वतः मान्यता मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आणि सप्टेंबर २०२४ मध्ये शासनाने ६०९.५८ कोटी रुपयांचा निर्णय जाहीर केला.निधीचे वाटप  वस्त्रोद्योग विभाग २५%, उद्योग विभाग ५०% आणि पर्यावरण विभाग २५%  अशा प्रमाणात करण्यात आले आहे.


प्रकल्पाचे मुख्य कामे:

इचलकरंजी, हातकणंगले आणि यड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ZLD (झिरो लिक्विड डिस्चार्ज) सह उन्नतीकरण

क्षमतेत वाढ

सुमारे ८१ कि.मी. सांडपाणी वाहिनी व पुनर्वापर पाईपलाईन

अन्य आवश्यक सुधारणा

‘इन्व्हायरो इन्फ्रा’ या कंपनीला रामगंगा नदी, काशी, मथुरा यांसारख्या ‘नमामी गंगे’ प्रकल्पांसह राजस्थानातील एसटीपी अपग्रेडेशनची यशस्वी कामे करण्याचा अनुभव आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्र्यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार माने यांनी नमूद केले.


खासदार माने यांचे मत:

“दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. ZLD प्रणालीमुळे या तीन औद्योगिक वसाहतीतून पंचगंगेत एक थेंबही सांडपाणी जाणार नाही. नदीला नवजीवन मिळेल, औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संतुलन साधले जाईल. मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न अखेर पूर्णत्वास जाईल.”



थोडे नवीन जरा जुने