BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

लाल किल्ल्यावर महाराष्ट्रातील १५ सरपंचांचा विशेष सन्मान - ९ महिला सरपंचांचा गौरव

नवी दिल्ली- यावर्षीच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या भव्य सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून १५ सरपंचांचा समावेश असून, उल्लेखनीय बाब म्हणजे यापैकी ९ जणी महिला आहेत.


१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा स्वातंत्र्यदिन संदेश ऐकतांना हे सर्व सरपंच उपस्थित राहणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून त्यांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे.


निवडलेल्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, तसेच सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण’ आणि ‘मिशन इंद्रधनुष’सारख्या योजनांचे प्रभावीपणे शंभर टक्के कार्यान्वयन करताना, स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.


महाराष्ट्रातील निवड झालेल्या सरपंचांची यादी 

प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, माढा, सोलापूर), जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, कामठी, नागपूर), संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, शिरूर, पुणे), डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, अकोला), नयना अशोक भुसारे (भावसे, शहापूर, ठाणे), सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, मालेगाव, वाशिम), अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, देसाईगंज, गडचिरोली), संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, जामखेड, अहिल्यानगर), चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, सालेकसा, गोंदिया), रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, लाखनी, भंडारा), सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, दापोली, रत्नागिरी), पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, जिंतूर, परभणी), प्रमोद किसन जगदाळे (बिदल, मान, सातारा), शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, अंजनगाव सुर्जी, अमरावती) आणि प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, उदगीर, लातूर).


या सर्व मान्यवरांचा १४ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये औपचारिक सत्कार केला जाईल. यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह), केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


“आत्मनिर्भर पंचायत विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘सभा सार’ अ‍ॅपचे लोकार्पण होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ या मासिकाचा १६वा अंकही प्रसिद्ध केला जाणार आहे.

थोडे नवीन जरा जुने