BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर

पुष्पा पाटील/कोल्हापूर, दि. 19 :जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत.


कोल्हापूरची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 35 फुटांच्या वर पोहोचली असून, शहरातील पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, राधानगरी धरणाचे सातही दरवाजे अद्याप उघडे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच कोयना, दूधगंगा आणि धामणी धरणांतून देखील नदी पात्रात पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



थोडे नवीन जरा जुने