BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर

पुष्पा पाटील/कोल्हापूर, दि. 19 :जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत.


कोल्हापूरची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 35 फुटांच्या वर पोहोचली असून, शहरातील पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, राधानगरी धरणाचे सातही दरवाजे अद्याप उघडे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच कोयना, दूधगंगा आणि धामणी धरणांतून देखील नदी पात्रात पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



थोडे नवीन जरा जुने