BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

नागपंचमीच्या जत्रेत थरारक क्षण! पाळणं अडकून ३० जणांचा जीव टांगणीला

बार्शी (सोलापूर जिल्हा) 

नागपंचमीच्या सणानिमित्त बार्शी शहरातील भगवंत क्रीडा मैदानावर उभारण्यात आलेल्या जत्रेतील आनंद अचानक थरारात बदलला. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास, मनोरंजन पार्कमधील प्रचंड उंचीच्या प्री-पॉल पाळण्याने अचानक काम करणे बंद केल्याने पाळण्यात बसलेले ३० हून अधिक नागरिक शेकडो फूट उंचीवर अडकले.


या घटनेनं काही काळासाठी संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली. रात्रीचा वेळ, गर्दी आणि उंचीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण संबंधित यंत्रणांचा विलंब, आणि परवानगी प्रक्रियेतील दुर्लक्ष, हे मुद्दे मात्र पुन्हा ऐरणीवर आले आहेत.


जत्रेचा आनंद झाला भयामध्ये परिवर्तित

सणाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने जत्रा पाहण्यासाठी जमले होते. खाद्यपदार्थ, खरेदी स्टॉल्स आणि वेगवेगळ्या खेळांच्या आकर्षणांमुळे वातावरण उत्साहात भरलेलं होतं. मात्र, जेव्हा पाळणं अचानक बंद पडलं, तेव्हा काही क्षणांसाठी शंका, गोंधळ आणि भय यांचा मिलाफ झाला.


उंचीवर अडकलेल्या नागरिकांमध्ये लहान मुलं, महिला, आणि ज्येष्ठ नागरिकही होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आणि अग्निशमन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाळण्याची रचना आणि उंची लक्षात घेता खासगी क्रेन मागवावी लागली. या क्रेनच्या सहाय्याने तब्बल १ ते २ तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व नागरिकांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं.


सुटलेले जीव, पण वाढलेले प्रश्न

सर्वजण सुरक्षित उतरल्यावर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला, मात्र त्याच वेळी प्रश्नही उपस्थित झाले –

क्रीडा मैदानावर जत्रा भरवणं कितपत योग्य?

जत्रेतील यंत्रणांची तपासणी आणि सुरक्षा व्यवस्थांची जबाबदारी नेमकी कोणाची?


प्रशासनानं परवानगी देताना कोणते निकष वापरले?

बार्शीच्या भगवंत मैदानावर दरवर्षी जत्रा भरवली जाते. मात्र, हे मैदान मुळात शहरातील खेळाडूंसाठी असलेलं अधिकृत क्रीडा मैदान असल्याने, त्या जागेचा जत्रेसाठी वापर होणं कितपत न्याय्य आहे, असा सवाल सुजाण नागरिक आणि पत्रकारांकडून आता जोरात विचारला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने