BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

गणेश मंडपासाठी रस्त्यांवर खड्डा खोदला, तर पालिकेचा १५ हजारांचा दंड!

मुंबई | गणेशोत्सवाची चाहूल लागली असून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, यंदा उत्सवाच्या तयारीत एक अनपेक्षित अडथळा उभा ठाकला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) रस्त्यावर मंडप उभारणीसाठी खड्डा खोदल्यास थेट १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा नवा नियम लागू केला आहे.


पूर्वी हा दंड फक्त २ हजार रुपयांचा होता. मात्र यंदा दंडाची रक्कम तब्बल साडेसात पट वाढवण्यात आल्याने मंडळांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गणेशभक्तांसाठी हा निर्णय नाहक अडथळा ठरत असल्याची प्रतिक्रिया विविध मंडळांनी नोंदवली आहे.


दुसरीकडे, राज्य सरकारकडूनही या नव्या नियमावलीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या मुद्द्यावरून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. “दोन हजार रुपयांचाच दंड आकारण्याच्या जुन्या नियमाचा फेरविचार व्हावा,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.


सार्वजनिक गणेशोत्सव हा मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. त्यामुळे मंडळांवर आर्थिक बोजा न टाकता सुज्ञतेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक मंडळांनीही स्पष्ट केले आहे.

थोडे नवीन जरा जुने