BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राधानगरी धरण भरलं! दरवाजे उघडले; पंचगंगा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण आज, २५ जुलै रोजी रात्री १० वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातील स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले आहेत. यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.


धरणातून सध्या वीज निर्मितीसाठी २,७६५ क्यूसेक आणि विसर्गासाठी ४,३५८ क्यूसेक असे एकूण ७,१२३ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे पंचगंगा व भोगावती नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


शुक्रवारी रात्रीपासून कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर कायम असून, धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. पावसासोबतच वाऱ्याच्या जोराने देखील दरवाजे उघडण्याची प्रक्रिया वेगाने झाली. रात्री १० वाजून १ मिनिटांनी पहिला दरवाजा उघडला आणि नंतर काही मिनिटांच्या अंतराने सहा दरवाजे आपोआप उघडले.


विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही नेमक्याच २५ जुलै दिवशी धरण भरून दरवाजे उघडले गेले होते. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जलसाठा वेगाने वाढत आहे.


प्रशासनाने पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये अलर्ट जारी केला असून, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे. शेतीपिके, जनावरे आणि विद्युत उपकरणांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.


सूचना

पुढील काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात व गरज असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

थोडे नवीन जरा जुने