भीमा कोरेगाव दंगलीतील प्रकरणांचा १५ ऑगस्टपर्यंत अहवाल; पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा सविस्तर अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. दंगलीनंतर आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती, त्यातील स्थानिक पातळीवरील गुन्हे, तसेच ते मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि स्थानिक समित्यांनी गुन्ह्यांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश दिले. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस उपस्थित अधिकारी व मान्यवर:
२०१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी आंदोलन झाले होते. त्यावेळी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल तयार करण्यात येत आहे.
