सोमनाथ स्वाभिमान पर्व
१००० वर्षे अखंड आस्था (Atoot Aastha)
सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा
भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशामध्ये सोमनाथ मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या पवित्र स्थानाचा गौरव करण्यासाठी "Somnath Swabhiman Parv - 1000 Years of Unbroken Faith" हा कार्यक्रम देशभर साजरा केला जात आहे.
कालावधी: ११ जानेवारी, २०२६ ते ११ जानेवारी, २०२७
राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप
संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, हा उत्सव सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहभागाने एक वर्षभर चालणारा राष्ट्रीय उत्सव म्हणून आयोजित करण्यात येत आहे.
मा. पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
११ मे, २०२६ रोजी मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी सोरटी सोमनाथ, गुजरात येथे या उपक्रमाचे भव्य उद्घाटन केले.
कोल्हापूर जिल्ह्याचा सहभाग व उत्साह
- थेट प्रक्षेपण: उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोल्हापुरातील श्री. अंबाबाई मंदिर आणि श्री. ज्योतिबा मंदिर येथे मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले.
- विद्युत रोषणाई: कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग जोतिबा मंदिर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीने उजळून निघाला आहे.

