BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

जनसंपर्कात सत्य आणि नैतिकतेची कास धरणे काळाची गरज – उपसंचालक प्रवीण टाके

News Post - Digital News Katta

जनसंपर्कात सत्य आणि नैतिकतेची कास धरणे काळाची गरज – उपसंचालक प्रवीण टाके

‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

कोल्हापूर | दि. २१ एप्रिल २०२६

‘कोरोना साथीनंतर जनसंपर्क क्षेत्र अधिक महत्वाचे झाले आहे पण विश्वासार्हता टिकवणे हे महत्वाचे आहे. तसेच एआय टूलच्या वापरामुळे कामास गती मिळते मात्र आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता जणे आवश्यक आहे, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ अधिकृत उदघाटन झाल्याचे जाहीर केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय)च्या कोल्हापूर चॅप्टर उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा. डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते.

एआय आणि रोजगाराच्या संधी

"जनसंपर्क आणि सत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एआयच्या काळात माहितीची सत्यता तपासणे आवश्यक बनले आहे. जनसंपर्क व माध्यमातील सर्वांनाच प्रॉम्प्ट ट्रेनिंग आवश्यक आहे. एआयचा वापर शिकल्यास नोकऱ्यांची संधी उपलब्ध असेल. पीआरएसआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते."
- डॉ. रवींद्र चिंचोलकर

प्रशासनाची भूमिका आणि 'गोल्डन अवर'

अंकुश चव्हाण म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत पहिले काही तास 'गोल्डन अवर' म्हणून महत्वाचे असतात. यंत्रणेने नेमके काय चुकले ते शोधून दुरुस्ती करणे गरजेचे असते. घटना घडल्यानंतर माध्यमांना तत्काळ योग्य माहिती दिल्यास नंतर खुलासा करण्याची गरज पडत नाही.’

विशेष सत्कार आणि मान्यवरांची उपस्थिती

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर:

प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, पी. एस. पाटील (माझगाव डॉक), सचिन अडसूळ (जिल्हा माहिती अधिकारी), वृषाली पाटील (माहिती अधिकारी), माधव जायभाई (आकाशवाणी), मोहन सूर्यवंशी (मपा जनसंपर्क अधिकारी), डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. दशरथ पारेकर, डॉ. वृषाली बर्गे, विवेक सिद्ध, सचिन मोरे, सरदार जाधव, विवेक पोर्लेकर, दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, सुनील भस्मे आदींनी मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा ईनामदारडॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य, जनसंपर्क, जाहिरात, विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सदर आयोजन पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टर आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

© 2026 Digital News Katta | Journalism with Ethics

थोडे नवीन जरा जुने