BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मासिक पाळीतील त्रास टाळण्यासाठी ‘डाएट + व्यायाम’ हे सुपर कॉम्बो...

मासिक पाळीचा काळ अनेक महिलांसाठी वेदनादायक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा ठरतो. पेटके, चिडचिड, मूड स्विंग्स आणि थकवा हे सर्वच या काळात सामान्य मानले जातात. मात्र, काही सवयी आणि योग्य जीवनशैली यामुळे या समस्यांना काही अंशी रोखता येऊ शकतं. आहार आणि नियमित व्यायाम ही दोन मुख्य पायाभूत गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीशी संबंधित लक्षणांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात.


व्यायाम: ‘हॅपी हार्मोन्स’चं रहस्य

अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना, पोटदुखी आणि मानसिक अस्वस्थता कमी प्रमाणात आढळतात. यामागे कारण आहे सेरोटोनिन आणि एंडोर्फिन सारख्या नैसर्गिक ‘हॅपी हार्मोन्स’ची निर्मिती, जी मूड सुधारते आणि वेदनांचा प्रतिकार करते.योगा, पाय स्ट्रेचेस, वॉकिंग किंवा हलकी कार्डिओ क्रिया या दिवसांत खूप उपयुक्त ठरतात. जोरदार व्यायाम टाळून सौम्य आणि संतुलित हालचालींवर भर दिल्यास शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात.


आहार: प्रत्येक घास ठरतो आरोग्यदायी

आपण काय खातो, याचा थेट परिणाम आपल्या चक्रावर होतो. संतुलित, पोषणमूल्यांनी समृद्ध आहारामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि त्यातील त्रासही कमी होतो.


अशा वेळी काय खावं 

फळं आणि भाज्या: दररोज रंगीबेरंगी फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

ओमेगा-3: मासे, अळशी, चिया बियाणे हे स्नायूंच्या वेदनांपासून मुक्ती देतात.

फायबरयुक्त अन्न: मल्टीग्रेन ब्रेड, बाजरी, राजगिरा, रोल केलेले ओट्स हे चयापचय सुधारतात.

प्रथिनं: अंडी, शेंगदाणे, दूध, दुग्धजन्य पदार्थ शरीराला मजबूती देतात.

पाणी आणि हर्बल टी: कॅमोमाइलसारखी टी तणाव कमी करते आणि हायड्रेशन राखते.


अशा वेळी काय टाळावं?

जास्त मीठ: पाणी साठून पोट फुगण्याची शक्यता

कॅफिन: झोपेचं गणित बिघडवतो आणि चिडचिड वाढवतो

साखर आणि तेलकट अन्न: मूडमध्ये अनावश्यक घालमेल


 पूरक आहार: डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

साध्या आहारातून मिळणारं पोषण अपुरं वाटल्यास, काही पूरक घटक (supplements) उपयुक्त ठरतात.

– व्हिटॅमिन B6 आणि B1: मूड सुधारते, पेटके कमी होतात.

– व्हिटॅमिन ई आणि डी: रक्तस्राव, वेदना आणि थकवा नियंत्रित ठेवतात.

– मॅग्नेशियम आणि कॅल्शियम: स्नायू शिथिल करतात, चिडचिड आणि गोंधळ टाळतात.

– जस्त आणि फिश ऑइल: रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, पाळीचं चक्र संतुलित ठेवतात.

यापैकी कोणताही पूरक आहार घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण काही वेळा ते औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकतात.मासिक पाळीतील त्रास ‘सहून’ घेण्याऐवजी त्यावर सजग पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. आपल्या आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल केल्यास या नैसर्गिक प्रक्रियेचा त्रास न होता ती सहजतेने पार करता येऊ शकते.


सूचना व अटी:

वरील लेखामधील माहिती ही सामान्य जनजागृतीसाठी आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. तुमच्या आरोग्यविषयक गरजांसाठी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. या वेबसाईटवरील माहितीच्या वापरामुळे उद्भवलेल्या कोणत्याही समस्यांसाठी 'महिला' किंवा संबंधित लेखक जबाबदार राहणार नाही. आपल्या वैयक्तिक प्रकृतीनुसार, निर्णय घेण्याआधी वैद्यकीय सल्लागाराशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

आपण आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत असल्यास, कृपया तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा लाभ घ्या.

थोडे नवीन जरा जुने