BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापुरात स्व. राजीव गांधी जयंतीनिमित्त भव्य सद्भावना दौड...

 कोल्हापूर :भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर काँग्रेसतर्फे आज भव्य सद्भावना दौड काढण्यात आली. या दौडीमधून स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागविण्यात आली.


राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीजवळ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडीची सुरुवात झाली. “राजीवजी गांधी अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. दौड शहरातील शाहू समाधीपासून प्रमुख मार्गाने पुढे सरकत शेवटी राजीव गांधी पुतळ्याजवळ समाप्त झाली.


या ठिकाणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर,शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


 ऋतुराज पाटील म्हणाले की, “राजीव गांधी यांचे विचार हे लोकशाही बळकट करणारे आहेत. पी. एन. पाटील यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सद्भावना दौडीसारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत.” त्यांनी पुढेही अशाच प्रकारे दरवर्षी सातत्याने आयोजन करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी आनंद माने, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळक्कर, सरला ताई पाटील, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, बबन रगडे, दत्ता कदम, शिरीष सोसायटी सभापती संतोष पाटील, मधुकर रगमणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसारकर, ईश्वर परमार, रियाज सुबेदार, प्रताप जाधव सरकार, रवी आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर, धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोपूजे, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दत्ता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय ममगूम, सरोजरा साळोखे, शिवानंद बनसोडे, किसनराव कुन्हाळे, भैया शेटके, काका पाटील, संजय पाटकर, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, मोहम्मद शरीफ शेख, अश्विनी शेख, दिपक थोरे, उमेश मोहिते, सचिन पाटील, सलील इनामदार, नायकडे, बी. आर. महाडीक, चंदा बेलेककर, उज्वला चौगुले, पूजा आरडे, मंगल खुळे, वैशाली जाधव,तसेच काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने