BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्याला गृहमंत्री घरी पाठवणार का

मुंबई  - माटुंग्यात सोमवारी सकाळी पावसामुळे शालेय बस पाण्यात अडकल्या, आणि त्यातले ५० हून अधिक विद्यार्थी काही काळ धोक्यात सापडले. पण तत्परतेने धावून आलेल्या माटुंगा पोलिसांनी त्यांना वाचवले, सुरक्षित ठिकाणी आणले आणि पालकांच्या ताब्यात दिले. या कार्यकुशलतेसाठी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जितके कौतुक केले जाईल तितके थोडेच. अशा प्रसंगांनी महाराष्ट्र पोलिसांचा जनतेवरील विश्वास वाढतो, पोलिसांबद्दल आपुलकी निर्माण होते. शासनानेही अशा धाडसी व संवेदनशील पोलिसांचा सन्मान करणे हीच वेळची गरज आहे.


परंतु दुःखाची बाब अशी की, याच पोलीस खात्यात काही अधिकारी वर्तनातून संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन करतात. अलीकडेच कुलकर्णी नावाच्या एका अधिकाऱ्याने गरीब आरोपीला सिने स्टाईल कमरेत लाथ घालून अपमानित केले. “सज्जनांचे रक्षण, दुर्जनांना शिक्षा” हे पोलिसांचे ब्रीदवाक्य असताना, न्यायालयाचा निकाल लागायच्या आधीच एखाद्याला त्याच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन छळणे म्हणजे पोलिस सन्मानाला काळिमा फासणारे कृत्यच. अशा घटना घडल्या की, जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतो हा अधिकारी सुशिक्षित, सुसंस्कारित कुटुंबातून आलेला आहे का, की कुठल्या क्रूर परंपरेतून?


सरकारने या दुहेरी वास्तवाकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. एका बाजूला संवेदनशीलता दाखवणारे पोलिस आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वागण्याने संपूर्ण पोलीस खात्याला बदनाम करणारे अधिकारी आहेत. गृहमंत्री म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी अधिक मोठी ठरते. त्यांनी अशा अधिकाऱ्याविरोधात तातडीने कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.


जनतेतला पोलिसांवरील विश्वास नाजूक आहे. तो वाचवायचा असेल, तर चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा हा समतोल साधलाच पाहिजे. महाराष्ट्रभरातून एकच मागणी होत आहे “या कुलकर्णीं पोलिसाला तात्काळ निलंबित करून घरी पाठवा.” अन्यथा “पोलिसांचा मित्र” ही ओळ केवळ घोषवाक्यातच उरून बसेल.

थोडे नवीन जरा जुने