BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

आक्रोशाचं समाजप्रबोधन !

कोमल वखरे विशेष लेख - संतांच्या परंपरेचा वारसाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि तोच वारसा आणि कीर्तनकार महाराज पुढे चालवत आहेत .मात्र समाज प्रबोधन करता करता राजकारण करण हे त्या कीर्तनकार भूमिकेला शोभत नाही  सद्यस्थितीला अशाच एका मुद्द्यामुळे महाराष्ट्राचे तापमान वाढलं आहे ती कीर्तनकार महाराज संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून 


प्रकरण झालं असं की महाराज संग्राम भंडारे यांचे संगमनेर तालुक्यामधील घुलेवाडी गावात कीर्तन सुरू होते त्याचवेळी एक व्यक्ती कीर्तनामध्ये व्यत्यय करण्याचा प्रयत्न करत होता बडबड गोंधळ घालत होता मात्र त्याचवेळी त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्याच्यासोबतच्या अजून एका व्यक्तीने आणि त्याने कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातच महाराज संग्राम भंडारे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला संताप  व्यक्त केला मात्र त्यांचा संताप हा भाषेची मर्यादा ओलांडणारा ठरला बाळासाहेब थोरात यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्या विरोधात मी आवाहन  करतो  अशा वृत्ती साठी आम्हालाही नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा  इशारा त्यांनी दिला महाराजांच्या या अविचारी वक्तव्यावरून राज्यभरात निषेध करण्यात येत आहे आणि बॅनर्स आणि सोशल मीडिया मधून महाराज संग्राम भंडारे यांच्यावर टीका करण्यात येत आहे समाज प्रबोधक असूनही नथुराम गोडसे यांचे समर्थन करणं कितपत योग्य आहे ? समाजामध्ये कीर्तन करत असताना त्यामध्ये राजकारणाचा उल्लेख का असावा ? असे प्रश्न समाजातून महाराज संग्राम भंडारे  यांना करण्यात  येत आहे खरं तर संग्राम भंडारे हे हिंदुत्वाच्या  आडून राजकारणाचा प्रचार सुरू असतो संतांनी कीर्तनांमधून समाजात शांतता निर्माण केली मात्र हल्लीचे कीर्तनकार  महाराज यांच्या विचारांनी समाजात हिंसा घडत असेल तर हे अध्यात्म योग्य आहे का ?

थोडे नवीन जरा जुने