BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

स्वातंत्र्यदिन आहे म्हणे...

दोन-तीन दिवसांपूर्वी मी मासिक पाळीवर एक साधी, नॉर्मल पोस्ट लिहिली होती.विषय इतका नैसर्गिक, आपल्या शरीराचा, आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग… तरी त्यावर इतक्या घाणेरड्या, विखारी कॉमेंट्स आल्या की सांगता सोय नाही. फक्त माझ्यावर न बोलता माझ्या आईवडिलांवर एका पुरुषाने केलेली घाण कॉमेंट मित्रांनी उत्तर देऊन थांबवली.


नंतर फेक प्रोफाइल, लॉक अकाउंटवरून येऊन अजूनही हास्यास्पद, टोचणाऱ्या प्रतिक्रिया…आणि धक्का बसला कारण त्यात काही स्त्रियाही होत्या.या सगळ्या कॉमेंट मी डिलीट केल्या... वरून काहींचा दावा की,मी लाईक ,कॉमेंट्स साठी पोस्ट लिहिली आहे...अहो, लाईक्ससाठी मी हपापलेली नाही…पण हो, बदलासाठी नक्की लिहिते मी... 


पण मनात एक प्रश्न कायमचा बसला , 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण मोठमोठी भाषणे देतो... स्वातंत्र्य, समानता, आदर वगैरे. पण अजूनही ‘पाळी’ हा शब्द बोलला तरी लोकांचे खरे चेहेरे समोर येत आहेत आणि त्यांच्या तोंडून...चेष्टा आणि घाणेरडे जोक्स बाहेर पडत आहेत. 

मासिक पाळीवर लिहिण्याचं माझं स्वातंत्र्य लोकांना का खुपतंय?

माझ्या शरीरावर मी लिहितेय… हे लोकांना समजत का नाही?

एक साधा प्रश्न, जर मासिक पाळीच नसती, तर तुम्ही-मी, हे सगळे जन्माला तरी आलो असतो का? स्वातंत्र्य म्हणजे फक्त देश परकीय सत्तेतून मोकळा होणे नाही. खरे स्वातंत्र्य म्हणजे विचारांनी, मनाने, समाजाने मोकळे होणे. पाळीवर बोलायला घाबरणारा, त्यावर घाणेरडी कॉमेंट करणारा समाज स्वतंत्र आहे असं तुम्हाला खरंच वाटतं का?  

#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य

योगेश्वरी भोसले

थोडे नवीन जरा जुने