BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

भविष्य - रोजगारासाठी गावं होतायत ओसाड!

विशेष लेख कोमल वखरे 

“खेड्याकडे चला” हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश आजच्या काळात पुन्हा आठवून द्यावा लागेल अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. कारण गावं हळूहळू ओस पडत आहेत. आज गावात केवळ वयोवृद्ध मंडळी आणि थोडेफार प्रौढ लोक दिसतात; तरुणाई मात्र शहराच्या हवेत गुंग झाली आहे.


गणेशोत्सवात पोरांची गजबज, वर्गणी मागणाऱ्या टोळ्या, नवरात्रीत देवीसाठी पायी चालणारी तरुण मंडळी  हे दृश्य आता केवळ आठवणीत राहिले आहे. मुलं-मुली दोघांनीही शहर गाठले आहे. मुलींसाठी पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर झालंय.

गावातली अंगणातली रांगोळी, पारावरच्या गप्पा, सामूहिक सण-उत्सवाची धांदल आता गायब होत चालली आहे. त्यांची जागा सोशल मीडियावरील शुभेच्छांनी घेतली आहे. मात्र गावं ओस पडण्यासाठी फक्त मोबाईल किंवा सोशल मीडिया जबाबदार नाहीत. या मागे दोन मोठी कारणे आहेत  शिक्षण आणि रोजगार.

ग्रामीण भागात आवश्यक सोयीसुविधा नाहीत. उच्च शिक्षणासाठी मुलांना शहरात जावेच लागते. त्यासाठी होणारा खर्च शेतकरी वडिलांच्या तुटपुंज्या कमाईतून भागवावा लागतो. रूम-हॉस्टेलच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं. या कर्जाच्या ओझ्यातून घरातील कर्ता पुरुष हळूहळू जगत असतानाच संपत जातो.

राजकीय नेते मात्र केवळ शेतकरी आत्महत्या मोजतात. पण या आत्महत्यांमागील खरी कारणं  व्याजाचं कर्ज, शिक्षणाचा बोजा, रोजगाराचा अभाव  याकडे लक्ष दिलं जात नाही. उलट ग्रामीण भागात जातीयवाद, घराणेशाही, राजकीय स्वार्थ, बॅनरबाजी यांमध्येच लोकं अडकून पडली आहेत.

आज आवश्यक आहे ती दर्जेदार शिक्षणव्यवस्था,व्यवस्थित वाहतूक व्यवस्था,आणि स्थानिक रोजगार निर्मिती.हे झालं तरच गाव पुन्हा जिवंत होईल. अन्यथा पुढील पिढीला गाव म्हणजे काय हे इतिहासाच्या धड्यातूनच समजावं लागेल.

थोडे नवीन जरा जुने