BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

यांनीही साजरा करायचा का स्वातंत्र्य दिन? ब्रिटिशांकडून मिळालं स्वातंत्र्य पण शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था ( तुम्ही-आम्ही) देतेय का?

तीन वर्षापूर्वी अमित शहा म्हणाले होते, उत्तर प्रदेश मधील कोणतीही मुलगी रात्रीच्या 12 वाजता रस्त्यावरुन फिरू शकते. आणि दोन तीन दिवसापूर्वीच एका 21 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. सातच्या आत घरात हा नियम तिने मोडला आणि एक तास तीला घरी जायला उशीर झाला म्हणून बलात्कार?


सांग तू मुस्लिम आहेस का? धर्म विचारत रोहण पैठणकर या दलित तरुणाला गायचोर आहे या संशयाने झुंडीन दगडाने झालेली मारहाण . त्याचे कपडे उतरवत हिंदू आहे की मुस्लिम हे पाहिल गेलं. खामगाव ही मधील घटना. सर्वधर्म समभाव असलेल्या देशात बौद्ध आणि मुस्लिम धर्माच असणं गुन्हा आहे का?


सासरच्या त्रासामुळे घर सोडून आलेल्या संभाजीनगरच्या एका महिलेला राहण्यासाठी मदत केली म्हणून, पुण्यातील कोथरूडमधील तीन तरुणींना पोलीस स्टेशनला नेऊन केलेली मारहाण, जातीवरून दिलेल्या शिव्या, त्यांचा केलेला मानसिक छळ. आणि या सर्वांनंतर त्या सासरच्या त्रासाला सामोरं गेलेल्या महिलेचं काय झाल? हे तर बाजूलाच राहीलं. त्या मुलींची एफआयआर घेण्यासाठीच इतका मानसिक शारिरीक त्रास त्यांना दिला गेला. त्यामुळे इथून पुढे करेल का कोणती मुलगी कोण्या मुलीला मदत? आणि धाडसाने पुढे येऊन मागेल का न्याय?


कंत्राटीकरण बंद करावं म्हणून महिनाभरापासून सुरू असलेलं नाशिकमधील आदिवासी आंदोलन. प्रत्येक ठिकाणी होणार खाजगीकरण पाहिलं की वाटतं. शासनच देश चालवतंय का? इतक्यातच एका वकील मित्राचा फोन आला. त्याच्याकडे आलेली केस सांगत होता . लग्न होऊन एक वर्ष झालेलं, सर्व व्यवस्थित चालू होत. एका वर्षानंतर मात्र मुलीला सासरच्या लोकांकडून त्रास द्यायला सुरुवात झाली . कारण काय असेल? तिने एका बाळाला जन्म दिला . जे बाळ मुलगी आहे.


मुली छोटे कपडे घालतात म्हणूनच मुलींचा बलात्कार होतो. महासत्ता होण्याच स्वप्नं पाहणारा हा देश आजुन मुलींनी कोणते कपडे घालावे? यावरच चर्चा करतोय.

अजूनही देशात जातीवरूनच माणसाची किंमत ठरवली जाते. 

देशाच खाजगीकरण होतय, देश विकला जातोय. 

हुंड्यासाठी जीव घेतला जातो.मुलगी झाली म्हणून छळ होतो. 


देशाबाहेरील कोणी आपल्या मर्यादा ठरवू नये म्हणून दिलेला लढा जितका महत्त्वाचा आहे. तितकच महत्त्वच या शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांच्याही लढणं आहे.आणि जोपर्यंत देशातल्या प्रत्येकाला त्याच स्वातंत्र्य जाणवत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा हा चालूच राहील.या घटना मागील फक्त दहा-पंधरा दिवसातील आहेत.असो,यांच माहीत नाही पण आपल्यावर अजून कुठे वेळ आलीय ? तोपर्यंत आपला स्वातंत्र्य दिन आनंदात जावा.🌼🌿


-क्रांती शामल सुवर्णा .



थोडे नवीन जरा जुने