BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

विवेक पोर्लेकर यांचे NET परीक्षेत घवघवीत यश..


कोल्हापूर :शब्दांवर प्रेम असलेले आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याची जिद्द बाळगणारे विवेक भगवान पोर्लेकर यांनी UGC-NET जून 2025 ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयातून त्यांनी 62.67 टक्के परसेंटाईल मिळवले असून, Ph.D. प्रवेशासाठी ते पात्र झाले आहेत. 


विवेक पोर्लेकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क विभागाचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या अभ्यासप्रवासात विभागातील मान्यवर प्राध्यापकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. विशेषतः विभागप्रमुख डॉ. निशा मुडे पवार, डॉ. चंद्रशेखर वानखेडे, डॉ. प्रसाद ठाकूर आणि डॉ. आलोककुमार जत्राटकर यांचे मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.

विवेक यांचे वडील भगवान संतू पोर्लेकर आणि आई अनिता पोर्लेकर यांनी शिक्षणप्रवासात दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहन हेच त्यांच्या यशामागील खरे कारण ठरले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे येत, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून आज ते अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

पत्रकारिता, शैक्षणिक संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रांत सकारात्मक योगदान देण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असून, Ph.D. च्या माध्यमातून समाजभान जागवणारा ठोस आवाज निर्माण करणे हा त्यांचा ठाम संकल्प आहे
थोडे नवीन जरा जुने